एस.एस राजामौली (S.S. राजामौली) हे भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. ‘बाहुबली’ हा एपिक ड्रामा फिल्मनंतर त्यांच्या ‘RRR’ या चित्रपटाला चांगलेच यश आले आहे. हे दिग्दर्शक ज्या पद्धतीने कथा प्रेक्षकांसमोर मांडतात ते खरोखरच अप्रतिम आहे. मात्र मग त्यांच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सगळ्यांना माहिती असली तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी कोणालाच माहिती नाहीय.
एस.एस राजामौली यांच्या पत्नी रमा या सुप्रसिद्ध चित्रपट व्यक्तींच्या कुटुंबातून येतात. राजामौली यांचे चुलत भाऊ एमएम कीरावानी यांची पत्नी श्रीवाली यांची ती धाकटी बहीण आहे. राजामौली चित्रपटांमध्ये असल्याने आणि अनेक दिग्दर्शकांना सहाय्य करत असल्याने, ते त्यांच्या भावी पत्नीला बर्याच काळापासून ओळखत होते. असे म्हटले जाते की 2000 मध्ये रमा आणि तिच्या पहिल्या पतीने एकमेकांपासून घटस्फोट घेतला. न्यायालयाच्या निर्देशानुसार रामाला त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय याचा ताबा मिळाला. यादरम्यान राजामौली यांनी रामाला भरपूर पाठिंबा दिला व तीला यासर्वप्रकरणातून बाहेर काढण्यास मदत केली.
त्यानंतर दोघांमधील भेटी – गाठी वाढल्या, दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आले. आणि एके दिवशी त्याने रामाला प्रपोज केले. रामाच्या मनातही राजामौलीबद्दल प्रेम वाढू लागले आणि त्यांनीही लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर दोघांनी साधे कोर्ट मॅरेज केले. एका मुलाखतीत राजामौली म्हणाले होते की, पहिल्या लग्नापासून रामाचा मुलगा कार्तिकेयसोबत मिसळायला त्यांना जास्त वेळ लागला नाही.
रमा एक उत्कृष्ट दर्जाची कॅास्ट्युम डिझायनर आहे, बऱ्याचदा तीने राजमौलींच्या चित्रपटासाठी कॅास्ट्युम डिझायनरचे काम देखील केले आहे. आजही ते दोघं व त्यांच कुटुंब सुखाचा संसार करत आहेत.