श्लोकाच का बनली अंबानी कुटुंबाची सूनबाई, जाणुन घ्या कारण

0
434
Find out why Shloka became the daughter-in-law of the Ambani family

अंबानी कुटुंबाकडे आज जे काही आहे, ते त्यांनी आपल्या मेहनतीने कमावले आहे यात शंका नाही. मुकेश अंबानी जन्माने श्रीमंत झाले असे नाही. प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणे त्यांनीही बालपणात अनेक चढउतार पाहिले आहेत. मेहनतीच्या जोरावर यशाच्या पायऱ्या चढूनही त्यांच्यात कसलाही घमंड नाही, हेही एक कारण आहे. त्यांना पैशाचे महत्त्व नीट कळते इतकेच नाही तर तेच गुण त्यांने आपल्या तीन मुलांनाही शिकवले आहे. देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असूनही अंबानी कुटुंब आपल्या सभ्यतेसाठी ओळखले जाते. मुकेश अंबानी असो किंवा त्यांची पत्नी नीता अंबानी, दोघांनाही चांगले माहित आहे की कुटुंबासाठी एकत्र राहणे किती महत्त्वाचे आहे. हे देखील एक कारण आहे की जेव्हा त्यांचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी एक अशी मुलगी निवडली होती जिला केवळ त्यांच्या कौटुंबिक मूल्यांची चांगली जाण नाही तर कुटुंबाच्या शैलीत देखील बसते.

अंबानी कुटुंबातील मोठी सून, श्लोका मेहता हिरे व्यापारी रसेल मेहता यांची सर्वात लहान मुलगी आहे. श्लोका मेहता आणि आकाश अंबानी हे शालेय जीवनापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मेहुणी ईशा अंबानी हिच्याशी तीचे घट्ट नाते होते. अशा परिस्थितीत जेव्हा आकाश अंबानीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा श्लोकाचे नाव ऐकून संपूर्ण कुटुंब सहमत झाले. कारण श्लोका मेहता आकाश अंबानीशी लग्न करण्यापूर्वीच अंबानी कुटुंबातील सर्व सदस्यांना ओळखत होती.

श्लोका मेहताचे तिच्या सासू नीता अंबानीसोबत खूप चांगले संबंध आहेत. एका मीडिया संस्थेला मुलाखत देताना नीता अंबानी म्हणाल्या होत्या की, ‘आकाशसाठी श्लोकापेक्षा चांगली मिळू शकत नाही. मी श्लोकाला ती 4 वर्षांची असल्यापासून ओळखते. तेव्हापासून श्लोकात अनेक बदल झाले आहेत. पण तीच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अजूनही तसाच आहे. मला ती मुलगी खूप आवडते याचा मला खूप आनंद आहे. त्याचवेळी आज माझ्या घरची सून होणार आहे. मी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब श्लोकाच्या स्वागताची वाट पाहत आहोत.

ईशा अंबानीच्या लग्नाच्या खूप आधी आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची एंगेजमेंट झाली होती हे फार कमी लोकांना माहीत असेल, पण त्यानंतरही ईशाच्या लग्नानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, हे करण्यामागे त्याचं आपल्या बहिणीवरचं खूप प्रेम होतं, जे आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतं. ईशा अंबानीने डिसेंबर 2018 मध्ये आनंद पिरामलशी लग्न केले, तर आकाशने तीन महिन्यांनंतर श्लोकासोबत लग्न केले. वोग इंडियाशी बोलताना ईशाने सांगितले की, ‘आकाश आणि श्लोका यांनी माझ्या लग्नासाठी त्यांच्या लग्नाची तारीख बदलली, ज्या दिवशी माझे लग्न झाले, त्याच दिवशी आकाश आणि श्लोकाचे लग्न होणार होते. त्या दोघांचे माझ्यासाठीचे हे समर्पण पाहून मीही खूप भावूक झालो.

नीता अंबानी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता, ‘आकाश आणि श्लोका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते, पण जेव्हा दोघांच्या लग्नाची बाब समोर आली तेव्हा आम्ही सगळेच आश्चर्यचकित झाले. आकाश आणि श्लोकाबद्दल मला शालेय दिवसांपासून माहीत होते, पण दोघांनीही घरच्यांच्या संमतीने आपलं नातं पुढे नेल आणि लग्नाचा निर्णय घेतला

Leave a Reply