बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अंतर आता फारच कमी झालं आहे. अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ सिनेमाने हे अंतर कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. साऊथच्या अनेक सिनेमांचे बॉलिवूडमध्ये रिमेक बनले आहेत.पुष्प चित्रपटाने सर्वांना भामभावून सोडलं आहे. या चित्रपटात रशमिका आणि अल्लू अर्जून महत्त्वाचे भुमिकेत दिसणारं आहे.
या आधि या चित्रपटाची भुमिका अनुष्का शर्माला देण्यात आली होती. तीने टॉलिवूडच्या टॉप मोस्ट अभिनेत्यांसोबत सिनेमे कऱण्याची ऑफऱ नाकारली होती. अनुष्का शर्माला ज्यूनिअर एनटीआरसोबत एक सिनेमा ऑफर करण्यात आला होता. त्यानंतर तिला अल्लू अर्जुनसोबतही एक सिनेमा ऑफर करण्यात आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन हरीश शंकर करत होते. इतकंच नाही तर अनुष्काला टॉलिवूडचा प्रिन्स म्हटला जाणाऱ्या सुपरस्टार महेश बाबूसोबतही एका सिनेमाची ऑफर आली होती. पण
अनुष्काने हे तिन्ही सिनेमे करण्यास नकार दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमांच्या दिग्दर्शकांनी अनुष्काला संपर्क केला होता. मात्र, मानधन आणि डेट्समुळे हे जुळून येऊ शकलं नाही.२०११ ते २०१४ दरम्यान टॉलिवूड दिग्दर्शकांना अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टॉलिवूड अभिनेत्यांसोबत कास्ट करायचं होतं. त्यावेळी अनुष्काचं करिअर जोरात होतं. ती या काळात पीके, बॅंड बाजा बारात, सुल्तान, रब ने बना दी जोडीसारख्या सिनेमांचा भाग होती. नंतर काही वर्षाने विराट कोहलीसोबत लग्न केलं आणि आता ती निवडक सिनेमात पहायला मिळत आहे. अनुष्का तिच्या प्रॉडक्शन हाऊसमुळेही बिझी असते यामुळे सिनेमात दुर्लक्ष झाले आहे.