अभिनेता धनुषने आज जाहीर केले की त्याने आणि त्याची पत्नी ऐश्वर्याने “18 वर्षांच्या मित्र, आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र राहिल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.” मेगास्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या ही चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका आहे.
अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्याने लग्नाच्या १८ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला. धनुषने ट्विटरवर सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्यापासून विभक्त झाल्याची घोषणा केली.
धनुषने लिहिले की, “मित्र, जोडपे, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहिलो. प्रवास वाढीचा, समजूतदारपणाचा, जुळवून देण्याचा आणि जुळवून घेण्याचा आहे. आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे झाले आहेत.
ऐश्वर्याने देखील हेच विधान इन्स्टाग्रामवर कॅप्शनसह केले: “कोणत्याही मथळ्याची गरज नाही. फक्त तुमची समज आणि प्रेम आवश्यक आहे.” धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न १८ नोव्हेंबर २००४ रोजी झाले. या जोडप्याला यात्रा आणि लिंगा अशी दोन मुले आहेत, ज्यांचा जन्म २००६ आणि २०१० मध्ये झाला.